समोरच्या राशीतलं फक्त पसाभरच माझं !
मग माझं मी निवडावं कसं ?
निवडक घेतलं तर सर्वांगी आवाका येत नाही.
सर्वांगी घेतलं तर वैशिष्ट्यपूर्ण होत नाही.
दोन्ही घ्यायचं तर पसा पुरत नाही.
निकं सत्त्व घेतलं तर गर गळून जातो.
गर घेतला तर सालाचे रंग येत नाहीत.
किंवा कित्येकदा निकं सत्त्व गर पचतही नाही.
शेवटी काय ?
आपला पसा आपणच पसरायचा !
आणि, आपणच ठरवायचा !
आणि, ठरवायचं
पश्यात आलेलंच आपलं मानायचं !
३.०३.१९९७